Posts

Showing posts with the label संशोधन आराखडय़ाच्या पायऱ्या

संशोधन आराखडय़ाच्या पायऱ्या

संशोधन आराखडय़ाच्या पायऱ्या उत्तम संशोधनासाठी चांगल्या   संशोधन आराखडा आवश्कता असते. चांगल्या आराखड्यासाठी संशोधनामध्ये करावयाच्या सर्व घडामोडीचा (पायऱ्या) अंतर्भाव संशोधन आराखड्यात येणे आवश्यक आहे. संशोधन आराखडा म्हणजे संपूर्ण संशोधन करण्यासाठी अपेक्षित बाबींची सूत्रबद्ध केलेली मांडणी (रचना) होय. संशोधन आराखड्यातील पायऱ्या :- (१)   प्रस्तावना :- संशोधकला ज्या क्षेत्रामध्ये संशोधन करायचे आहे. त्या क्षेत्राशी निगडीत प्रथम समस्या जाणवली पाहिजे. समस्येची जाणीव झाल्यावर संशोधकाला त्या समस्येची मांडणी प्रस्तावनेच्या स्वरुपात करता आली पाहिजे. यासाठी संशोधकाला संबंधित   क्षेत्रातील माहिती असणे आवश्यक आहे. (२)   संशोधनाची गरज व महत्व : - संशोधकाने संबंधित क्षेत्रातील समस्येची मांडणी केल्यानंतर त्या समस्येवर संशोधनाची गरज का आहे. हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. त्यानंतर त्या समस्येची सोडवणूक केल्यावर सामाजिक परिस्थिती नेमका कोणता बदल होणार आहे. व त्या समस्येच्या सोडवनुकीमुळे जन-सामान्य लोकांना त्याचा काय, कसा व कोणता फायदा होणार आहे. त्यामुळे या संशोधनाला प्राप्...